जन्म कुसुमाग्रजांचा ,सौभाग्य महाराष्ट्रा चे!लाभे कृपा शारदेची ,भाग्यवंत आम्ही येथे ! माय मराठी रुजली,अमुच्या तनामनात!दूध माय माऊलीचे,प्राशिले कृतज्ञतेत ! साहित्य अंकी खेळले,लेख, कथा अन् काव्य!माऊलीने उजळले ,ज्ञानदीप भव्य- दिव्य! घेतली मशाल हाती ,स्फुरे महाराष्ट्र गान !भक्तीचे अन् शौर्याचे,राखले जनी हे भान! ज्ञानेश्वरी ज्ञानयाची,सोपी भाषा तुकयाची!मराठी रामदासांची ,समृद्धी माय मराठीची! सौंदर्यखनी मराठी,कौतुक तिचे करू या!मी महाराष्ट्रीय याचा,अभिमान बाळगू या!
Category: Long Poems
जागतिक महिला दिन
“यत्र नार्यस्तु पूज्यंते रमन्ते तत्र देवता”(जिथे स्त्रीची पूजा होते किंवा जिथे स्त्री पूजनीय असते तिथे देवाचा वासअसतो) थोडक्यात स्त्रियांची कार्य शैली, त्यांचे जीवन, चरित्र जेंव्हा एक आदर्श म्हणून आपण मानतो आणि तेथे दैवी अनुभूतीचा अनुभव घेतो . मी कर्मकांड मानणारा नाही त्यामुळे कदाचित दैवी नसेल तरी एका निर्मळ वातावरणाची निर्मिती मात्र आपण अनुभवतो. स्त्रीची लज्जा, तिच्या चेहऱ्यावरचे हास्य हि तिची आभूषणे आहेत तर अश्रू तिचे अस्त्र . पण कोणाही स्त्रीच्या डोळ्यात आलेले अश्रू जीव हेलावून टाकतात. ते आनंदाचे असले तरी आणि ते वेदनेचे- अपमानाचे- अवहेलनेचे असले तरी . ज्या घरातील स्त्री आनंदी ते घर समाधानी आणि ज्या समाजातील स्त्री सन्मानित तो समाज प्रगतिशील हे नक्की . तरी देखील स्त्रीवरील अत्याचार, तिचे शोषण पिढ्यान पिढ्या चालत आले आहे . आपण आज स्वतःला प्रगत- सुशिक्षित समजतो , पुरोगामी मानतो , पाश्चात्य संस्कृती अंगीकारून modern. म्हणवूंन घेतो. पण समाजातला बराचसा भाग अजूनही रूढीवादी (CONSERVATIVE) आहे , बराचसा अशिक्षित आणि मागासलेला देखील आहे . थोड्याफार प्रमाणात पहिला वर्ग सोडला तर सर्व ठिकाणी स्त्री हि फक्त “रांधा वाढा उष्टी काढा ” यातच अजूनही अडकली आहे . तिच्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघणेही सगळीकडे सारखेच. निर्भया, हैदराबाद, सारख्या घटना घडतात आणि आपण त्या मूग गिळून बघत बसतो, किंवा त्यावर आपल्या परीने निषेध व टिपणे नोंदवतो आणि media त्या मीठ मसाला लावून दाखवत बसते . . यातून आपण काय शिकणार ? पालक आपल्या मुलींना मर्यादेत राहण्याचे शिक्षण आणि संस्कार देतातच पण तेच संस्कार मुलांनाही द्यायला पाहिजेत . प्रत्येक स्त्री ही आई किंवा बहीण मानणे शक्य नसले तरी एक मैत्रीण असू शकते -एक व्यक्ती म्हणून तिची स्वतःची व्यक्तिगत तसेच सामाजिक ओळख आणि मान आहे आणि तो ठेवला पाहिजे हि जाण आणि भान लहानपणापासून आणून देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे आणि वेळोवेळी त्यांनी त्याची खात्री करून घेतली पाहिजे . मुली आज सगळ्याच क्षेत्रात मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात , काही वेळा त्यांच्या पुढेही असतात . क्षेत्र corporate. असो किंवा जाहिरातींचे , entertainmaint. चे असो त्या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. वेळ प्रसंगी त्यांचा पेहराव , वावरणे काही सो कॉल्ड सुधारकांना किंवा समाज संरक्षकांना आक्षेपार्ह वाटत असेल आणि त्याबद्दल ते संस्कार आणि संस्कृतीच्या नावाने व्यर्थ आरडाओरडही करतात. पण तीच गोष्ट मुलांनी केलेली चालते – हे दुटप्पी पणाचे आहे. भान सर्वांनी ठेवले पाहिजे मुलांनी , पालकांनी , समाजाने , मुलींनी आणि स्त्रियांनीही. बऱ्याच वेळेला एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या अवहेलनेला असुरक्षिततेला कारणीभूत असते , हे थांबायला हवे स्त्री ही कायमच जननी राहणार आहे त्या भूमिकेतून तिला बाहेर काढणे हे तिलाही शक्य नाही आणि त्या स्वातंत्र्याचा तिनेही अट्टाहास करुही नाही कारण त्याने unbalance. तयार होईल .तिच्या कार्यक्षेत्राचा आवाका वाढतोय आणि तिचा आत्मविश्वास वाढतोय व तो समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक आहे हेही तेवढेच खरे व तिला सक्षम करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत स्त्री केवळ सुरक्षित पणे नाही तर मनमोकळेपणाने समाजात वावरली पाहिजे तरच आपल्या पुरोगामी म्हणण्याला अर्थ आहे निर्भया व तशा हिडीस गोष्टी घडू नयेत यासाठी या गुन्हेगारांना लवकरात लवकर मोठी शिक्षा हवीच, जेणेकरून असे प्रसंग परत होणार नाहीत. पण त्याबरोबरच एक नवी दृष्टी असलेली सामाजिक जाणीव आणि संस्कार घडवण्याची ही तेवढीच गरज आहे मगच त्या यत्र नार्यस्तु पूज्यंते रमन्ते तत्र देवता (जिथे स्त्रीची पूजा होते किंवा जिथे स्त्री पूजनीय असते तिथे देवाचा वास असतो) उक्तीला अर्थ आहे महिला दिनाच्या सर्व माता-भगिनी, मैत्रिणींना शुभेच्छा !!!
नको हारतुरे नको मानसन्मान,माणुस म्हणुन वागव तिला हीच फक्त तुझ्याकडुन अपेक्षाकरतेच तडजोडी ती क्षणोक्षणी,वात्सल्य मांगल्याच्या बेडीत अडकवुन नको करुस तिला शिक्षा शरीरबल कमी तरी नाही ती अबला,कणखर ती, अभेद्य ती, अमुल्य तीसंकटी सर्व चराचरा घेऊन पदराखाली करतेच ना ती रक्षामहानतेचा तिच्या जागर फक्त एक दिवस??बुद्धीचा न मिरवता कधीच तोरा, नजरेत ठेवते ती प्रत्येक लक्षाप्रेमळ ती, कोमल ती,गृहीत नको धरु दुखावते ती, संतापते ती,लावशील ठेच तिच्या आत्मसन्मानाला तर होईल ती सर्वभक्षाचाणाक्ष ती, समंजस ती बुद्धिमान तीसोडुन सगळा अहंकार रे समाजपुरुषा, घे तिच्याकडुन माणुसकीची दिक्षानको हारतुरे नको मानसन्मानमाणुस म्हणुन वागव तिला हीच फक्त तुझ्याकडुन अपेक्षा……
प्रेम लता…
सहजची भेटता तू आणि मी,काही चमकले हृदयीच्या हृदयी! बीज अचानक मनी पेरलेप्रीतीचे का ते काहीतरी! तिसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशी,बीज अंकुरे मम हृदयी! प्रेम पाण्याचे सिंचन करिता,अंकुर वाढे दिवसांमाशी! मनी वाढली प्रेम न् आशा,रोप वाढता पाचव्या दिवशी! प्रीतफूल उमलले त्यावरी,‘प्रपोज डे’ च्या त्या दिवशी! फूल प्रीतीचे मिळे मला,‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी,फूल बदलले फळात तेव्हा,परिपक्व प्रेम मिळे हृदयी!
मिठी …
आयुष्यात सोबतकायम तिचीच असावीबाहूंच्या कवेत येण्यातिची कधी ना नसावी ॥ १ ॥ नजरेत नजर खिळून राहावी. जरी दुभंगे धरणीविसरून जाव्या सर्व यातनात्या मोहक क्षणी ॥२॥ आलिंगनात या रुसवे- फुगवेसारे विरून जावेगालावरच्या खळीत तिच्यामी स्वतःला हरवून जावे ॥३॥ करकमलांची ही मिठीराहो वा ना राहोदेह वेगळे झाले तरीजीव एकमेकांत गुंतून राहो II४॥
ऋतूंची फुलमाला..
वसंत येईल राजा बनुनी,चैतन्याने भरली अवनी !नवसृजनाचे दालन उघडुनी,नवल उमटले माझिया मनी! ग्रीष्म झळा त्या येता भुवनी,तगमग होई सजिव जीवनी!शोधित जाई गारवाही मनी,चाहुल घेई वर्षे ची आंतुनी! वर्षेचा पहिला शिडकावा,चराचराला देई गारवा !वाट पहातो ऋतू हिरवा,दिसेल तेव्हा बदल नवा! शरदाचे दिसताच चांदणे,आनंदाला काय उणे !चंद्रचकोरी नभात बघणे,धरतीवर स्वप्नात रंगणे! हेमंता ची लागताच चाहुल,पडे थंडीचे घरात पाऊल!दाट धुक्याची घेऊन शाल,निद्रिस्त राही निसर्ग विशाल! शिशिराची ती थंडी बोचरी,पान फुलां ना निद्रिस्त करी!जोजवते आपल्या अंकावरी,शांत मनोरम सृष्टी साजरी ! सहा ऋतूंची ही फुलमाला,निसर्ग वेढितो ती सृष्टीला!प्रत्येक ऋतू बहरून आला,अस्तित्वाने मनात फुलला!
सरते वर्ष
गतसालाच्या आठवणींची,सुंदर अन् रंगीत कमान !डोळ्यापुढती बघताना ती,मनीचे माझ्या हरपले भान! गतसालाच्या खुणा उमटल्या,देई उजाळा आठवणीना !कसे वर्ष गेले काही न कळले,आठवता त्या मधुर क्षणांना! मेळ घातला लेखिका सख्यांचा,वेगवेगळ्या उत्सव निमित्ताने!नवीन काही मला गवसले,मन भरले त्या आनंदाने! काव्य, कथा अन् ललीत लेखन,अधिकच माझ्या मना भावले!साहित्याच्या नवनवीन रंगी,मन माझे हे गुंतून गेले ! अखंड राहो आपली मैत्री,सर्व सख्यांच्या प्रेम ज्योती!व्हाट्सअपच्या माध्यमातूनही,जुळली आपली प्रेमळ नाती! निरोप देऊ या सरत्या वर्षाला,स्वागत करू या नववर्षाचे !आनंदाचे, सौहार्दाचे वर्ष आले,दिवस येऊ द्या भाग्याचे !
चांदोबास
चांदोबाच्या गोष्टीतला चांदोबा तू !माझे सारे बालपण व्यापून टाकलेस !कधी भाकरी सारखा गोल गोल,तर कधी चवथीच्या कोरी सारखा !मामाचा वाडा चिरेबंदी ठेवणारा,आणि लिंबा मागे जाऊन लपणारा ! तारुण्यात येताना तुझ्या साक्षीने,आणाभाका घेतल्या,तर लग्नानंतर मधुचंद्राततू मिरवलास ! नंतर मात्र…माझ्या बाळाच्या संगतीतमी तुझ्याशी भावाचे नाते जोडले!आणि तू चंदा मामा झालास ! पुढे पौर्णिमा ते संकष्टी..दिसलास तू आभाळी ..बदलत्या रूपात, आकारात...तुझे सहस्रचंद्र बघणाराकिती भाग्यवान ! म्हणून सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यात,तुझा किती मान! असा तू चांदोबा,सगळ्यांचा लाडोबा ! बालपणापासून वार्धक्यापर्यंत,सर्वांना लोभवणारा….आणि मला भुलवणारा ….
सरली दिवाळी
सरली दिवाळी,जपू मनी आनंदाचे क्षण!प्रत्येक दिवाळीची,मनी असे वेगळी आठवण! वसुबारस ते भाऊबीज,दिवस असती प्रकाशाचे!तोच प्रकाश मनात राहो,दिवे उजळीत अंतरीचे ! स्नेहभाव वाढीस लागे,उणी दुणी विरघळून जाती!दीपावलीच्या आनंदात,झरती स्नेहाच्या बरसाती! रेखते अंगणी रांगोळी,ठिपक्यांची अन् नक्षीची!तशी राखावी सर्वांची अंतरे,रेखीव, सुंदर नात्यांची! असेच राहो मन आनंदी,निमित्त कशाला दिवाळीचे?प्रार्थना करू ईश्वराची,निरंतर राहो सौख्य मनाचे!
दिवाळी येणार !…
दिवाळी पुन्हा येणार !जुन्या आठवणी आणणार..नव्या आठवणी जागवणारदिवाळी परत येणार दिन दिन दिवाळी गाईम्हशी ओवाळी म्हणायचोआता त्या तरी आहेत कुठं आसपास…तशा तेव्हाही सर्वांच्या आसपास नव्हत्याचलहानपणी असायचा दिवाळीला गोतावळामजा खूप यायची आता तर तो नाही.. एखादा भाऊ..एकुलती बहीण एकच मामा… एखादी आत्या…आपण ही एकटेचतरीही जमतो भाऊबीजेला … सख्खे चुलत मावस सगळेच…कधी घरी ….कधी बाहेर आणि आहेत की मित्रमंडळी…काही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणारी, फराळाला भेटणारी अन् काही आपल्यासारखी Wapp वर विश करणारी आपण ही किती बदललोवाडा-चाळीतून अपार्टमेंट मध्ये आलोकाल होती सायकल..आता गाडी आलीतेंव्हा होती पुस्तके, आताही ती आहेतच त्याबरोबर नेट आहे, माहितीचा खजिना आहेकालपर्यंत होती फटाक्यांची दिवाळीआता थोडे फटाके थोडी संगीतमय दिवाळी तेंव्हा बरंच काही करायचो…आताही बरंच काही करतोफटाके उडवायचं तसंही वय नाही…लहानांना ही किती वाजवायचे केंव्हा वाजवायचे याची जाण आलीकाळ बदलला… मी बदललो…दिवाळी ही बदलली करोना, लॉक डाऊन…थोडी भीती, दबलेला उत्साह…संपलं सगळंआता नवीन उमेद, नवीन उत्साह, नवा जोम तरीहीआठवणी येणार …येत रहाणार…आणि दिवाळी ही..मीही आकाशकंदील लावणार.. नवीन कपडे घालणार..दारात पणती लावणार…फराळावर ताव मारणार.. मित्रांना भेटणार… तुम्हाला शुभेच्छा देणार..दिवाळी येणार..परत येणार.. येत रहाणार