दरवर्षी चार जुलैला वाढदिवस असतो माझा आणि दरवेळी मागचे किती वाढदिवस कसे झाले, ते डोळ्यासमोर येऊन जातात! जणू फोटोच्या अल्बमची पाने मी उलटत होते! पन्नास वर्षांपूर्वी फोटो काढणे हे तितकेसे कॉमन नव्हते. कॅमेराच मुळी नवीन होता तेव्हा! साधारण ६०/६५ वर्षांपूर्वी आमच्या घरी कॅमेरा होता, अर्थात ही माझ्यासाठी ऐकीव गोष्ट! माझ्या वडिलांना फोटोग्राफीची आवड होती. फोटो काढणे, ते स्वतः डेव्हलप करणे हे ते शिकले होते, त्यामुळे आमच्याकडे खूप जुने फोटो अजूनही बघायला मिळतात! स्वातंत्र्यापूर्वी वडिलांचे कुटुंब कराची ला होते, तेथील त्यांच्या घराचे, कराची शहरातील फोटो अजूनही आमच्या अल्बम मध्ये आहेत. अगदी पूर्वीच्या कॅमेरात आठ फोटो निघत असत. नंतर छोटे छोटे सोळा आणि 24 फोटो निघणारे रोल आले. कॅमेरा मध्ये जसजशा सुधारणा होऊ लागल्या तस तसे अधिक चांगले आणि जास्त फोटो मिळू लागले. आणि खर्च ही कमी येऊ लागला. फोटोंचा अल्बम ही लोकांच्या आवडीची गोष्ट बनू लागली. घरातील लग्न,मुंजी, बारसे किंवा कोणताही कार्यक्रम असला की फोटो काढून त्यांचा अल्बम बनवला जाऊ लागला. आमचे दादा मग प्रत्येक अल्बम ला नाव देत. “गोड स्मृती” नावाचा पहिला अल्बम अजूनही माझ्या माहेरी आहे. तिथे गेले की मी कौतुकाने ते जुने फोटो बघू शकते आणि त्यामुळे मनाला खूप आनंद मिळतो. अल्बम मधील काही व्यक्ती आता काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या तरी आपल्याला फोटो बघून ते जुने दिवस आणि माणसे यांचे स्मरण होते! आता तर काय मोबाईल मुळे फोटो काढणे खूपच सोपे झाले आहे, पण प्रिंटेड फोटो अल्बम ची शान मला वेगळीच वाटते! स्वतःच्या आयुष्याचा हा अल्बम उघडताना माझ्याही डोळ्यासमोर माझ्या छोट्या छोट्या छबी दिसू लागल्या. आईच्या कडेवर बसलेली मी, तर कधी रडत असलेली, नुकतीच पावले टाकू लागलेली मी, मला फोटोतून दिसली. नवीनच पंजाबी ड्रेस घालून शाळेला जायच्या तयारीत असलेली चार-पाच वर्षाची ऋजू ही एका फोटोत दिसली. दोन वेण्या वर बांधलेल्या आणि काळ्या रंगाचे पांढरे खडी असलेले परकर पोलके घालून वडिलांबरोबर समुद्रावर फिरायला गेलेली मी, मला फोटोत दिसली. त्यानंतर स्कर्ट ब्लाउज घालून शाळेत जाणारी मी मला जाणवून देत होती की,’ तू आता मोठी झालीस!’ नकळत 1964 साल उजाडले आणि मी दहा वर्षाची झाले! शाळेत असताना माझ्या वाढदिवसाला आई माझ्या मैत्रिणींना घरी फराळाला बोलवत असे. आणि मग छोटासा मनोरंजनाचा कार्यक्रम ही होत असे. त्यात चिठ्ठ्या टाकून उचलायला सांगितले जाई आणि चिठ्ठीत असेल त्याप्रमाणे गाणे, नाच, नक्कल किंवा खेळ करून दाखवावे लागत असे. तेव्हा खायच्या पदार्थात पावभाजी, केक नसे पण घरी केलेले दडपे पोहे, चिवडा, लाडू यासारखे पदार्थ असत. मग आमची पार्टी मजेत होत असे. असे वाढदिवस साजरे करता करता अल्बम मध्ये मॅट्रिकच्या वर्षीचा ग्रुप फोटो आला आणि त्यामुळे आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो याची जाणीव झाली. कॉलेजची वर्षे सुरू झाली आणि घरचा वाढदिवस बंद होऊन बाहेर हॉटेलात वाढदिवस साजरा होऊ लागला. फोटोसेशन होऊ लागले. मित्र मैत्रिणींबरोबर वाढदिवस मजेत साजरे होऊ लागले. छान छान गिफ्टची देवाणघेवाण होऊ लागली आणि हा अल्बम विस्तारत गेला. अजूनही कधी ते फोटो बघते तेव्हा पुन्हा एकदा मनावर आठवणींचे मोरपीस फिरते! बघता बघता किती वाढदिवस साजरे झाले, परंतु खरी मजा आणि प्रेम मिळाले ते लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला! सरप्राईज म्हणून मिळणारी साडी किंवा दागिना वाढदिवसाला शोभा आणू लागला. मग नवऱ्याबरोबर केक कापतानाचा फोटो अल्बम मध्ये आला. मुलांच्या जन्मानंतर आपल्यापेक्षा मुलांचे वाढदिवस साजरे करत असलेले फोटो अल्बम मध्ये दिसू लागले. ते चौकोनी कुटुंब असे आमचे फोटो आता अल्बम खुलवू लागले! मध्यंतरीच्या काळात मुलांनी आमचे वाढदिवस साजरे केले.’ आई, तुझ्या वाढदिवसाला मी तुला सरप्राईज गिफ्ट देणार आहे’. म्हणत मुले त्यांनी साठवलेल्या पैशातून माझ्यासाठी आठवणीने छोटी मोठी वस्तू आणू लागली आणि माझा ऊर आनंदाने आणखीनच भरून येई! अरेच्या! किती मोठे झालो आपण! असे म्हणतच अल्बम मधल्या फोटो भर पडत होती! आता काय साठी उलटली! मुलांची लग्न कार्ये झाली. सून, जावई, नातवंडे यांच्या आगमनाने वाढदिवस पुन्हा एकदा जोरात साजरे होऊ लागले! फॅमिली ग्रुप फोटोंची अल्बम मध्ये भर पडली. छोटी नातवंडे अंगा खांद्यावर विसाऊ लागली. काळ्या केसांमध्ये रुपेरी चांदीची भर पडली. वय जाणवायला लागले. वाढदिवसाला आणलेला गजरा माळण्याइतके ‘ केस नाही गं उरले’ असं लेकीला म्हटलं तरी,’ आई तुला मोगरीचा गजरा आवडतो ना, म्हणून मी मुद्दाम आणलाय ‘ असं म्हटलं की त्या छोट्याशा केसांवर तो घालावाच लागे. असे वाढदिवस साजरे करता करता हळूहळू साठी उलटली. सांधे कुरकुरायला लागले. आता काही नको तर वाढदिवस असे वाटू लागले. इतकी वर्षे काढलेले फोटो अल्बम मध्ये बघताना आपल्या मधला फरक जाणवू लागला! कुठे ती लहान ऋजू, नंतर लग्नानंतरची उज्वला आणि आता तर उज्वला आजी! अल्बम मधील सरकती वर्षे बघता बघता मी रंगून गेले! फोटो मुळेच ही किमया झाली आहे .खरंच, मन:चक्षुपुढे येणाऱ्या छोट्या मोठ्या व्यक्ती आपण वर्णन करून सांगू नाही शकत! पण फोटो मुळे मात्र व्यक्ती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहते ,ही तर आहे फोटो अल्बम ची किमया! आता दरवर्षी चार जुलैला वाढदिवस येतो. मुलांच्या सोबत साजरा करताना केक कापला जातो. फोटो काढून होतात. पुन्हा एका नवीन वर्षात पदार्पण केले म्हणून! आठवणींच्या अल्बम मध्ये आणखी एका फोटोची भर! अशाच आनंदात वाढदिवस साजरा करत राहायचंय, जोपर्यंत भिंतीवरच्या फोटोमध्ये आपण जाऊन बसत नाही तोपर्यंत….
Category: Long Poems
विठूची रखुमाई…
रखुमाई नाजूकशीसावळा रांगडा विठ्ठलजोडी जमली कशीमला पडे नवल नाथांच्या घरीहा भरे पाणीजनीच्या मागे धावेशेण्या उचलूनी कबिर गाई दोहेहा विणतो शेलानाम्यासाठी हाउष्टावतो काला ज्ञानोबांसाठी हाभिंत चालवतोतुकोबांचे बुडलेलेअभंग वाचवतो दामाजीनी गरीबांसाठीरीती केली कोठारेविठू महार होऊनीहा परत ती भरे चोखामेळा , गोरा कुंभारयाच्या भक्तांची किती गणतीआस लागलेल्या बायकोचीयाला नसे काही भ्रांती काळाचेही रहात नाहीयाला काही भानवाटेकडे डोळे रख्माईचेलावूनी तनमन भक्तांच्या हाकेलाहा सदा धावून जातोशेजारच्या रखमाईलामात्र विसरुनी जातो मुलखाची भाबडीमाय भोळ्या भक्तांचीभाळली काळ्यावरयुगत ना कळली तयाची विठूसंगे नाव सदायेते रखुमाईबरोबर असून नसे जवळरुसतसे बाई याच्यासंगे राबे हीसर्व भक्तांच्या घरीबोल कोणा लावावातिचाच तो सावळा हरी….
वारी….
पंढरपुरी वारी जाई ,विठ्ठलाच्या दर्शनाला lजाती पाय वेगे वेगे,आतुरले ते भेटीला …..१ विठू राहे पंढरीत ,जमे भक्तांचा मेळावा lमाहेराची ओढ जशी,लागते लेकीच्या जीवा …..२ चहूबाजू येती सारे,टाळ, चिपळ्या घेऊन lविठ्ठलाची गाणी गाता,मन जाई हे रंगून …३ आषाढाची वारी येता ,वारकऱी मन जागे lभेटीस आतुर होई,पांडुरंगी ओढ लागे …४ वारी निघे पंढरीला,कानी टाळांचा गजर lवेग येई पावलांना,राऊळी लागे नजर ….५ जसा जसा मार्ग सरे,मन होई वेडे पिसे lडोळ्यापुढे मूर्ती येई,विठ्ठल सर्वत्र दिसे ….६
वटपौर्णिमा…
तो वड एक महानघालून प्रदक्षिणा ज्यालापरत मिळवले सावित्रीनेआपल्या प्रिय पतीचे प्राण तो आणि असे अनेक वडअजूनही उभे आहेतपाय जमिनीत रोवून घट्टऐकतात दरवर्षी तेनवसावित्रींचें पतीहट्ट वडाला फेऱ्या मारणाऱ्यादोरीचे बंध बांधणाऱ्यासगळ्या स्त्रिया का सावित्री असतात ?ज्यांच्यासाठी त्या व्रत करतातसगळे का ते सत्यवान असतात ? सात जन्मी हाच मिळावा जोडीदारयासाठीच होते जरी प्रार्थनामनात दोघांच्या असतात कानक्की तशाच भावना ? सावित्रीला आजच्या हवा आहे खरंच कातो सत्यवान जन्मोजन्मी ?आणि ज्याच्यासाठी उपास करतातसत्यवानाला त्या हवीय का तीच सावित्री पुढल्या तरी जन्मी !!! सावित्री -सत्यवान महती त्यांची थोरत्यांच्यापुढे आपण सारे लहानथोरमहत्वाची आहे तरी प्रेम -भावना सात जन्म कोणी पाहिलेत ?हाच जन्म महत्वाचामिळाली ती सावित्रीआहे तो सत्यवान जपायचा संस्कार म्हणून वटपौर्णिमासण साजरा करत राहूया …पतीपत्नी सारे विश्वास अन् प्रेमाचं रोप सतत फुलवत ठेऊया
मानवाने जन्म घेऊन कळतनकळत या वसुंधरे वर अनन्वित अत्याचार केले आहेत. मीही त्यातीलच.हे जन्मभूमी वसुंधरे तूतव उपकाराच्या ऋणात कृतघ्न मीहिमाच्छादित सोनकिरणांची शुभ्रता तूउजाड पर्वतावरील काळाकभिन्न कातळ मीशांत सोज्वळ अखंड प्रवाहित गंगा तूउथळतेने स्तोम माजविणारा जलप्रपात मीशितलतेची मूर्त तरुरुपी सावली देणारी तूपरावलंबी खुरटे खुजे बांडगूळ मीआसेतू हिमाचल द्वीपसमूहास बांधणारी तूवंश जात धर्म प्रांतात अडकणारा मीप्रेमपाखर अथक वृद्धिंगत करणारी तूफाटक्या झोळीचा कायम याचक मीवरदानांची नित्य बरसात करणारी तूदे बुद्धी लवकर कधी उतराई होणार मी.
जागतिक चहा दिन २१में
गरमागरम चहा द्या मज आणुनी…पिऊन टाकीन मी आनंदाने…किती किती प्रकार त्याचे,कधी आल्याचा, कधी वेलचीचा, तर कधी दालचिनीचा… दरवळ दरवळ पसरे..कधी बशीतून, फुर् करोनी,कधी गरम गरम घोट घेऊनीआस्वाद त्याचा घेतच रहावा,कधी कटिंग तर कधी फुल… कधी खारी सवे,तर कधी पाव बुडवून…मनसोक्त चहा पिऊन घ्यावा…जागोजागी अमृततुल्य चहालज्जत आणतो भारी… चहा पिण्याची तर तऱ्हाच न्यारी….असती जगात अनेक व्यसने..चहाचे व्यसन जगात लय भारी…..पाहुण्याचे आदरातिथ्य,चहाच देतो पोचपावती…. फुळुक पाणी, पांचट, काळाकुट्ट, कडवट…किती किती विशेषणे लावती तयाला….तरी सदैव तयार तुमच्या स्वागताला….म्हणूनच म्हणते…गरमागरम चहा द्या मज आणुनी..,पिऊन टाकीन मी आनंदाने….☕☕☕
*आई **
आई – उच्चारलेले पहिले नावआनंद वेदना प्रत्येक प्रसंगात ओठी येणारे तेच नाव जवळ असते तेंव्हा नसते भानआणि नसते तेंव्हा अडते प्रत्येक पानमोठे झालो दूर गेलो पणआई पाशी कायम लहानच राहिलो सण-वार आले की तिच्या हाताची चव आठवतेआणि मनात उमाळे दाटून येतात मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या अनेक आठवणी आहेततिच्या मुलालाच फक्त कळावेत असे काही शब्द आहेत आई असते घरातील एक धागाघरातील सगळ्या फुलाचा हार करूनत्यांना दाखवते योग्य जागापाऊस येतो ओले करून जातोआईच्या प्रेमाच्या पावसासाठी आपण कायमच आसुसलेले राहतोवर वर तिचे अस्तित्व जाणवत नाहीठेच लागली तर तिच्याशिवाय कोणाला साद जात नाही आई सर्वांची काही वेगळी नसावीमाझ्या सारखीच तुमची असावी खरच आई बाळाची माउलीआई भर उन्हात शांत सावली आई दुधातली मलईआई भांड्यांना तेजावणारी कल्हई आई जशी कृष्णाने द्रौपदीला दिलेली थाळीकधीही न संपणारी तिची प्रेमाची झोळी सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा !!!
सोनसळी बहावा
एका रात्री पाहिला बहावा,चंद्र प्रकाशी बहरताना !गुंतून गेले हळवे मन माझे,पिवळे झुंबर न्याहाळताना! निळ्याशार नभिच्या छत्राखालीलोलक पिवळे सोनसावळे!हिरव्या पानी गुंतुन लोलक,सौंदर्य अधिकच खुलून आले. ! शांत नीरव रात भासली,जणू स्वप्नवत स्वर्ग नगरी!कधी न संपावे ते अपूर्व क्षण,आस लागली मनास खरी! फुलवल्या बहाव्याच्या मिठीतसामावून अलगद जावे!मृदू कोमल स्पर्शाने त्याच्या,अंगोपांगी बहरून यावे!
चैत्र पाडवा
नव वर्ष प्रतिपदा!ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केलेला दिवस!मग त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे… गुढी उभारणे हे आपल्या मनातील परमोच्च आनंद गगनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयास होय!शुभ सुभग, सुखद दिन..चैत्र मास, चैत्र पालवी सारा सृजनाचा सोहळा… ऋतू जरी शुष्क उन्हाळा..रसदार फळांचा असतो मेळा..अशाच या चैत्र मासातील पहिला नववर्ष सोहळा.. आबाल- वृद्ध आनंदी आनंदी..तरुणाईच्या स्वप्नांची वृद्धी..नवविवाहितांच्या ये आनंदा भरती… सौख्यदारी ,सौख्य घरी….आम्रपर्णी तोरणे, दारी..सुंदर रंगावली रंगली प्रांगणी.. प्रातःकाळी कडूनिंब पानाचे सेवन….हो वरदान सकल वर्ष आरोग्य संपन्न….गोडधोड, मिष्टान्न सुग्रास भोजन… रसना होय तृप्त जरी….बहुगुणी तांबूल मुखी खूमारी….काय वर्णन ते गुढीपाडव्याचे करावे? व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने रूढीस चालत न्यावे…बदलते जग, बदलते विचार…रुपडे बदलले साजरा करण्याचे… हेतू मात्र एकच सदैव..आनंद द्विगुणित करण्याचे…..कोकिल रव पडता कानी…. बहरलेला आम्र तरू मधुमासा ची आठव देतो….चैत्र पाडवा नव्या स्वप्नांचा इमला बांधण्यास सज्ज होतो….
वळीव
आला वळीव वळीव,विझवी होळीच्या ज्वाळा!धरती ही थंडावली,पिऊन पाऊस धारा ! मृदगंध हा सुटला,वारा साथीने फिरला!सृष्टीच्या अंतरीचा,स्वर आनंदे घुमला! गेली सूर्याची किरणे,झाकोळून या नभाला !आज शांतवन केले,माणसाच्या अंतराला! तप्त झालेले ते मन,अंतर्यामी तृप्त तृप्त !सूर्या, दाहकता नको,मना करी शांत शांत !