ज्योत लाविलीस तू,मनामनात सर्वांच्या!शिक्षणाची कास तू,धरलीस स्त्रियांच्या ! ज्योतिराव, सावित्री,गाठ बांधली स्वर्गात!एकरुप होऊनी,मग्न झाले कार्यात! दीनदुबळया दलितांना,आधार त्यांचा मिळाला!अनाथ,सान बाळांना,मायेचा झरा लाभला! अस्पृश्यतेस दूर सारूनी,दीप समानतेचा लावला!मुलामुलींना शिक्षणाचा,ध्यास तुम्ही लावला! शेणगोळे आणि शिव्याशापझेलले तिने धैर्याने !तिच्या त्यागाची फळे,आज चाखतात मानाने! ममता, समता यांचे नाते,जोडले समाजात त्यांनी!ऋण त्यांचे विसरू नये,हीच इच्छा मन्मनी !
Category: Long Poems
नववर्ष
भले बुरे जे…घडुन गेले…विसरुनी जाऊ… सारे क्षणभर…जरा विसावु…या वळणावर…या वळणावर….! लहान पणी केंव्हा तरी… रेडिओवर…भले बुरे जे घडून गेले… विसरुनी जाऊ सारे क्षणभर… हे गाणं हलकंस पहिल्यांदा कानावर पडलं…! हळूहळू ते गाणं कानात झिरपत होतं नी पडुन रहावसं वाटलं… ऐकत… अर्थपूर्ण कडवे सगळे…सुरेख चाल…! तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं गाणं…! खरंच आहे…आयुष्यात किती तरी वळणे येतात… कधी संकटातुन.. वेदनेतून…कधी आनंदात… ही वळणं येतातच येतात.. मग ते वळण कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्या समाजातलं, मित्रपरिवार असो… किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणी…! अगदी शाळा, कॉलेज, कर्त्या-निवृत्त वयातलं सुद्धा… पुढचा प्रवास बदलणारा असतो… हेच वळण जे निर्विकार असतं.. एक वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ…अवकाश…! भलं बुरं.. घडामोडी घडुन गेलेल्या असतात नि त्यामधला हा विसावा असतो क्षणिक या वळणावर…! खुप उन्हांनं बेजार झाल्यावर जसं पाऊस पडण्यापुर्वीचं आभाळ तयार होतं किंवा खूप पाऊस पडून कंटाळवाणं झाल्यावर पावसाने उघडीप दिल्यानंतर जसं स्वच्छ ऊन पडतं ना अगदी तसं..! ह्याच वळणावर जरा आयुष्य संथ झालेलं असतं… मनाला वाटतं की घडामोडींना पूर्णविराम मिळालाय पण वास्तव मध्ये तो स्वल्पविराम असतो…… जसं एक वाक्य संपत असतं नी दुसरं वाक्य सुरू होण्याच्या बेतात जणू काही…! पान उलटणार असतं नि माहिती नसतं पुढच्या पानावर काय ओळी लिहिल्यात ते…….! पुस्तक बंद करता येतं हो एकवेळ पण आयुष्याचं पुस्तक शेवटच्या श्वासापर्यंत वाचावंचं लागतं…! नको असलेली पानं सोडून पुढं जाता येत नाही… अन हवी असलेली मागची पानं परत कधीतरी वाचताही येत नाहीत…! ती आपोआप पालटत असतात…! पलटवावीच लागतात…नवीन वाचावीच लागतात….! फक्त विसावा काय तेवढा आपला… बाकी वळणांचं नशिबावर सोपवुन आपण जीवन प्रवास करायचा…! आज एक वळण संपतय, नवीन चालू होतंय… येणाऱ्या नववर्ष २०२४ च्या हार्दिक शुभेच्छा !!
31:12:2023
आयुष्य सरते.. वर्ष संपते…तीच सकाळ. तोच सूर्य…काय बदलते..कालचे असते ते आजचे होते… कालचक्राची गती अधिक गतिमान होते….आयुष्य जगलेले दिवस आठवणीत जाऊन बसतात…आणि येणारा नवीन दिवसतोही भूतकाळ होणार आहे हे विसरून प्रारब्धा प्रमाणे जगत राहतात… काय दिले.. काय घेतले..किती हिशोब केले तरी…गेले ते गेलेच.. परत फिरून येणे नाही… मग ते माणसाच्या बाबतीत आणि अचेतन वस्तूच्या बाबतीतही होते… वर्ष संपले… आपल्या आयुष्यातील या जन्माचा राहण्याचा कालावधी कमी झाला..किती उन्हाळे किती पावसाळे पहाणे बाकी? याचा हिशोब मनात सुरू झाला…सारे कसे अघटीतच.. विज्ञान किती पुढे गेले तरी मानवी मनाचा शोध अपूर्णच राहिला…पृथ्वीची उंची खोली मोजून झाली…साऱ्या चल अचल पंचतत्त्वांची बेरीज करून झाली…पण अजूनही मानवाच्या आयुष्याची मोजमाप अपूर्ण राहिली… ग्रह तारे, ज्योतिषीय भाकिते हस्तरेखा.. सारे सारे ढुंडाळून झाले…पण जगण्याचे अंदाज चुकत गेले…. कोणाला कुठे हवे असते… दुःखाचे, वेदनेचे, अश्रूंचे, गरीबीचे आयुष्य…श्रीमंती, वैभव, सुखासीन ऐश्वर्य संपन्न.. अशीच कामना असते…पण प्रारब्धाप्रमाणे प्राप्तन प्राप्त होते….जीवा सवे आयुष्य येते.. वर्ष सरते तसे आयुष्य सरते… सरासरी आयुष्याचा कालमान पाहताना…जगात अनेक अद्भुत घटना घडून गेल्या…सामान्य जीवाला त्या कोठे स्पर्शून गेल्या…त्याचे आपले जगणे आणि जगण्यासाठी संघर्ष करणे इतकेच काय ते उरले…. सध्या राममय झालेले जग…अयोध्या.. अक्षता कलश..विरोधी पक्षाचा थयथयाट…येत्या वर्षाच्या निवडणुका…आणि संजय राऊत च्या ऐवजी सतत टीव्हीवर दिसणारा जरांगे पाटील …काय काय म्हणून लक्षात ठेवायचे…काही झाले तरी शेतकऱ्यांच्या समस्या…आम्हा नोकरदारांचे काय?कुठे बसतो आम्ही…आरक्षण नाही… रक्षण नाही..आयुष्य जगण्याच्या कल्पना आम्ही करू शकतो….पण त्यासाठी पोषक वातावरण नाही…सरते वर्ष… आशा पल्लवीत ठेवूनच पुढे सरकायचे….आपले आयुष्य आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा आपल्याच हिमतीवर आपणच पूर्ण करायच्या…कोणी देईल , कोणी करेल ह्या अपेक्षा नाही ठेवायच्या …. नरदेह सर्वात समृद्ध जन्म..पाप पुण्य.. बरे वाईट याचे आकलन असते…आत्म्याचा परमात्म्याकडे सुरू झालेला प्रवास असतो….म्हणूनच सरत्या वर्षाला बाय बाय करताना… येणाऱ्या वर्षाचे ज्याने त्याने आपल्या परीने आनंदाने स्वागत करावे… प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना, सुखाचा उपभोग घेण्याच्या कल्पना वेगळ्या असतात…म्हणून आपल्या इच्छांचे ओझे दुसऱ्यावर लादू नये…होता होईल तो मनास जपावे…मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची….तू चाल पुढ…. तुला भीती पर्वा कशाची…अगदी अशीच वाटचाल करावी…चला इथेच थांबते….अस्तमानी सूर्य चालला आहे…त्या तेजाला उद्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतापासूनच माझ्या नेत्र ज्योतींच्या पायघड्या घालण्यास सुरुवात करते….
नवीन वर्ष….
नवीन दिवस, नवीन वर्ष ,कालचक्रातील पुढची आरी !कितीक गेल्या फिरत फिरत,आत्ताची ही आहे न्यारी !….१ काळाच्या गतीतील एक वर्ष,देऊन गेले कितीक गोष्टी ,जगण्यासाठी समृद्ध अनुभव,बांधला गेला अपुल्या गाठी !…२ रहाटगाडगे कालचक्राचे,विश्वामध्ये फिरत रहाते !प्रत्येक पोहरा भरून येतो,अनुभव त्याचे करित रिते !….३ कालचक्रावर असतो आपण,एक अस्तित्व ते बिंदू मात्र !त्या बिंदू चे नाते असते,परमात्म्याशी परम पवित्र!….४
अवतार दत्तगुरूंचा…..
श्री दत्तगुरु अवतारा ,त्रिगुणात्मक जगतारका !अवतरला तुम्ही जगती ,तारण्या सकल दुःखकारका!….१ उत्पत्ती, स्थिती, लय जाणू,त्रिगुण हे या जगताचे !ब्रह्मा,विष्णू, महेश ,साक्षी भूत त्या लीलेचे !…..२ सती अनुसये चे सत्व ,इथे लागले पणाला !तिन्ही बालके सृष्टीची ,जागवले तिने मातृत्वाला!….३ गौरव झाला जगी या,अनुसया मातृभावाचा !दिगंबरा तुझा अवतार,न्याय देई अजब हा साचा!…४
ज्ञानेश्वर माऊली..
इंद्रायणी काठी,आळंदी नगरी !ज्ञानाची वैखरी,वहातसे!…….१ ज्ञानोबा माऊली,सुखाची सावली!समाधिस्थ येथे,निरंतर!…..२ सोन्याचा पिंपळ,त्याच्या पायी ज्ञाना!करीतसे ध्याना ,निरंतर……३ ज्ञानियांचा राजा,शिष्य निवृत्तीचा !सागर ज्ञानाचा ,सर्वांसाठी…..४ मन तृप्त होई,पाहुनी समाधी!मनास ही शांती,मिळतसे……५
आनंदाची दीपावली….
आला दिवाळीचा सण,आनंद, सौख्य दे मना !सर्वांना आनंदी ठेव,हीच ईश्वरा प्रार्थना !….१ लक्ष दिव्यांची रांगोळी,उजळे सारी दिवाळी !सुख सौख्य आरोग्याची,आनंदाची मांदियाळी.!….२ फुटे फटाक्यांची माळ,येई आनंदा उधाण !अंगणी खेळती मुले,वाटीत आनंदी वाण !…..३ दीपावलीच्या शुभेच्छा,सर्वास आनंददायी !आयुरारोग्य सर्वा मिळो,हीच इच्छा मनाठायी!….४ आनंदाची दीपावली ,सौख्य देईल सर्वांना!निरंतर सुख मिळो ,ही देवाजीस प्रार्थना!…५
दिवाळी
संपले तिमिर सारे, तेजात न्हाइली नगरेपथ सर्व उजळती, विहरती आनंद लहरे दीप लाखो प्रज्वले, मिटवण्या काळोख साराधुंद तो घेऊन सुगंध कुठूनसा आला वारा लहान थोरच काय निसर्ग सुध्दा उल्हसित होईआपल्या अंगणी ही आकाशकंदील झळकवी मिरवतो आकाशकंदील टांगलेला ऊंचावरीसडा रांगोळी सजली अन् तोरण सजे दारी अभ्यंगस्नान मग होई उटणे सुगंधी लावूनीतापलेले गरम पाणी, चढवीतसे न्यारीच धुंदी गोडगुलाबी थंडी बोचरी, फुलवी रोमांच अंगीनवनवीन वस्त्रे लेवूनी, सारे जाती रंगून रंगी दिव्यांची ही रोषणाई असे प्राण दिवाळीचाशकुनाची सुवर्णकिरणे, अंत करी वेदनांचा सकाळ होता जमती सारे,तिखटगोड त्या फराळासणासुदीची गोडी वाढे जमे जेव्हा आप्तांचा मेळा दिवाळीची महती सांगू किती, परमोच्च सुख आहेआबालवृद्धांसंगे देव सुध्दा वाट पाहे भोवताली भुकेले पोरके असतील कितीआनंद पोचवूया त्यांच्यापर्यंत…….आज तुम्हाला ही विनंती
देवीचे नवरंग….
पहिली माळ सजे, केशरी रंगाने,सजवी देवीला, झेंडूच्या हाराने! ..१ पांढऱ्या रंगाची, माळ दुसरी,पावित्र्य घेऊन, आली साजरी!…२ तिसरी माळ रंग, लाल घेऊन आली,जास्वंदीची लाली येई, देवीच्या गाली!..३ चवथ्या माळेला, निळे स्वच्छ आभाळ,कुमकुमार्चनाने फुलले, देवीचे भाळ!…४ शेवंतीची फुले वाहू, पाचव्या माळेला,पिवळ्या रंगाचा शालू, शोभे देवीला!..५ सहाव्या माळेला, हिरव्याची किमया,देवीला भरु या, बांगड्या हिरव्या!..६ सातव्या माळेला, रंग येईल करडा,देवीला देऊया, मानाचा विडा.!..७ आठवी माळ करी, गुलाबी उधळण,देवीच्या खेळा मिळे, मंदिर अंगण!..८ नववी माळ सजे, जांभळ्या रंगाने,देवी सौख्य देई, जांभळ्या साजाने!..९ नवरंगाची पखरण, होई नऊ दिवस,दसऱ्यास सज्ज, देवी सिम्मोलंघनास!.१०
गणपती विसर्जनतो निघाला
आला आला म्हणेपर्यंतबाप्पा माझा निघालाआनंद घेऊन आला चतुर्थीलाआज डोळ्यांत पाणी आणून चालला केली मी उत्तरपूजानिरोपाची आरती झाली“पुढच्या वर्षी लवकर या” म्हणतानाबाही माझी ओली झाली सोबतीने बाप्पाच्या माझ्यासुख घरी वसले होतेवर्षभराच्या मळभातूनमन मोकळे झाले होते दर्शनाने रोज त्याच्याप्रसन्न होत होते सारेसजली होती आनंदानेनात्यागोत्यांची आभासी मखरे नको ढोल नको ताशेबँड बाजाही आज नकोतसंही माझ्या बाप्पालाभक्तिभावाखेरीज काही नको निसर्ग मात्र यंदा जराजास्तच प्रसन्न होतागच्चीतल्या बागेतून बाप्पालारोज नवीन फुले वाहात होताजाता जाता मात्र आकाशातूनभरपूर तो बरसून गेला निघाला आज देव माझाघर सुगंधित मंगल करूनजाताना मात्र नेहमीप्रमाणेजीव माझा आला भरून एक मात्र बरे झालेबाप्पा घरातच विसर्जित झाले पुनरागमनायचं म्हणालो तरीतुझ्याजवळच राहतो म्हणाले पुनरागमनायचं म्हणालो तरीतुझ्याजवळच राहतो म्हणाले *हरि: ॐ तत्सत् *इति श्रीगणेशार्पणमस्तु