राहुल लाळे तिळगुळ घेऊन गोड बोलुनीजिंकून घ्यावे मन साऱ्यांचेसंक्रांत केवळ निमित्त असावेव्रत असू द्यावे हे आयुष्यभराचे कुणास टोचू नये काटेहलव्यासारखे हसत रहावेकोणी टोचले जरी काटेआपण हास्यच फुलवत रहावे हलवा- तिळगुळ देऊन कधीकटुता मनातली जात नसतेबोल प्रेमाचे द्यावे घ्यावेआनंदाचे वाण लुटावे नुसते हाच खरा तिळगुळ समजावागोड बोलणं सोडू नकाकाहीही झालं तरी यापुढेघेतला वसा टाकू नका
Category: Long Poems
अघटित…..
उज्वला सहस्रबुद्धे, पुणे हे अघटित आहे खास,थंडीत आकाश ढगाळ !मनास करते उदास,अन् थेंबात उगवे सकाळ!….१ उबदार थंडीची शाल,हेमंत ऋतु पांघरतो!घेऊनी ढगाची झूल ,नकळत दिवस उगवतो….२ गेलास ऋतुरंग बदलून ,लपलास कुठे घननिळा?प्रश्न पडला मम मनाला, पावसाळा की हिवसाळा!…३ शांत, स्तब्ध निसर्गाला,निश्चल केले कोणी ?चैतन्य कधी त्या येईल,वाट पाहते मी मनी !….४
ओढाळ मन
उज्वला सहस्रबुद्धे मन आभाळ आभाळ,कधी सान, कधी विशाल!कधी पाण्याचा डोह,कधी सागर नितळ! कधी असे ते पाखरू,तेजापाशी झेपावलेलेकधी असे ते निश्चल,कूर्मापरी स्थिरावलेले! कधी अतीच चपळ,निमिषातच दूर धावे!कधी असते निश्चल,वज्रासारखे एक जागे! मना तुझा ठाव,घेता येईना जीवाला!फिरते मीही तुझ्या संगे,गिरकी सोसेना ती मला!
पानगळ
पानगळ जरी झालीतरीही झाड परत बहरते… फुलंफळं लुटली जाऊनहीखोडाला पुन्हा पालवी फुटते… आपणही का नाही मग झाड व्हावं ? आप्तजनांची पानं गळताहुंदके गिळून नवा बहर ल्यावा…. आशेची पालवी नेसावीआठवणीतून नवस्वप्ने पहावी छायेत आपल्या इतरांनाही सावली द्यावीसारी दुनिया खुलवून टाकावी….
गोपी -कृष्ण…
नदीच्या काठावर,झऱ्याच्या पाण्यात ,निळाई अंगावर,पांघरून संगत ….१ मनाला भुरळ,घाली तो सतत!देतोस तू जणू,कृष्णसख्या साथ!….२ झाडांची सावली,पाण्यात हिरवाई,जळाच्या आरशात,मोरपिसे कृष्णाई!…३ गोपी येती साथीला,दंग झाल्या लीलेत,कृष्णाच्या संगतीत,धुंद होऊन नाचत!….४ रास रंगे गोकुळी ,गोकुळ होई सुखी!नवनीत देती गोपी,कृष्णाच्या गोड मुखी.!…५ येई सांज सकाळ,घेऊन रंग सोनेरी,आनंद देई मला,कृष्णाची बासरी!….६
कुठे गेलीस तूss
अक्षय तृतीयेचा अक्षय ठेवा..आईची आठवण.. नाही नजरेसमोर, नाही कधी भेटणार..अक्षय तिचे माझ्यात असलेलेतिचे गुण ही साठवण.. नाही कधी तिची बरोबरी होणार..अवगुणांची खाण मी, ती माझी हिऱ्याचे कोंदण… किती आठव तुझे करावे,तुझ्याविना सारे सहावे…तुटले बंध संपून गेले माहेरपण.. माहेर या शब्दास मुकले..अंतरी पायीचे घुंगुरवाळे,माहेरच्या आठवणीत लडिवाळे नादावत राहिले… वेणीत माळलेला मोगऱ्याचा गजरा सुकोनी गेला..भिजल्या नयनी अश्रू ओघळले.. सणासुदीला पावडर कुंकू काजळ नटवून रुपडे अपुले..आई मी कशी दिसते?😥तिच्या डोळ्यातले अपार प्रेम अप्सरेस ही लाजवून गेले… आई तुझे नसणे पदोपदी मनास समजावून गेले…तेवढ्याच उत्कटतेने तुझ्या आठवणीत मन रमून गेले.. गढूळलेले थकले मन फिरून प्रफुल्लित होऊन गेले…हे आई चैतन्याच्या खाणीतुझ्या सवे जगायचे अजून राहून गेले….
सत्य….
दुःखालाही कंटाळा आला,वास्तव्याला राहण्याचा !सतत प्रश्न अन् कटु सत्याला,संगत घेऊन जगण्याचा !…..१ कोण तू अन् कोण मी,आपण सारे भाग सृष्टीचेउत्पत्ती अन् लय यांचे,साक्षी निसर्ग किमयेचे !….२ कुठे, कसे, कधी जन्मा यावे,हे तर आपल्या हाती नाहीलक्ष योनीतून फिरता फिरता,जगी काळ घालवतो काही !…३ धागे सारे मोह मायेचे ,उगीच बांधतो स्वतःभोवतीमोहवणाऱ्या जगी जिवाला,गुंफून घेतो अवतीभवती !….४ सत्य चिरंतन मना उमगते,जेव्हा येते कधी आपदानिमित्त मात्र ही असतो आपण,भू वरी या सदा सर्वदा !…५
विश्वास…
चालले होते विश्वासावर,साथ आहे कायमची !कधी मनात आले नाही,वेळ येईल ताटातुटीची ! सप्तपदी ची गाठ आपली,शेल्याची अन् शालूची!रेशीम धागे मुलायम त्यांचे,भीती नव्हती तुटण्याची! आज अचानक सोडून गेलात,राहिले एकटी मी या जगी !राहील का हो तुमचा आधार,अद्रुष्य पणे माझ्या पाठी ! विश्वास आहे पुनर्जन्मावर,गाठ पडेल पुढील जन्मी!त्या क्षणाची वाट मी पाहीन,सात जन्माची साथी मी !
*आई **
आई – उच्चारलेले पहिले नावआनंद वेदना प्रत्येक प्रसंगात ओठी येणारे तेच नाव जवळ असते तेंव्हा नसते भानआणि नसते तेंव्हा अडते प्रत्येक पानमोठे झालो दूर गेलो पणआई पाशी कायम लहानच राहिलो सण-वार आले की तिच्या हाताची चव आठवतेआणि मनात उमाळे दाटून येतात मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या अनेक आठवणी आहेततिच्या मुलालाच फक्त कळावेत असे काही शब्द आहेत आई असते घरातील एक धागाघरातील सगळ्या फुलाचा हार करूनत्यांना दाखवते योग्य जागापाऊस येतो ओले करून जातोआईच्या प्रेमाच्या पावसासाठी आपण कायमच आसुसलेले राहतोवर वर तिचे अस्तित्व जाणवत नाहीठेच लागली तर तिच्याशिवाय कोणाला साद जात नाही आई सर्वांची काही वेगळी नसावीमाझ्या सारखीच तुमची असावीखरच आई बाळाची माउली असतेभर उन्हात शांत सावली असते दुधातली मलई असतेभांड्यांना तेजावणारी कल्हई असते आई जशी कृष्णाने द्रौपदीला दिलेली थाळीकधीही न संपणारी तिची प्रेमाची झोळी
जागतिक कविता दिन….
कविता माझी येई अचानक,काळजाच्या त्या गाभ्यातुन …अलगद कोमल शब्दछटातुन …भावनेच्या शब्द झऱ्यातुन…. कधी असते ती कल्पना भरारी..कधी ती देते दुःख वेदना उरी..कधी ती असते हसरी साजरी..तर कधी उमटे व्यथेतून खरी! मनीच्या गर्भी रुजून रहाते…चैतन्यावर ते बीज पोसते…अंकुरे जेव्हा मनात तेव्हा…इवल्याशा रोपात बहरते ! जशी उमलते , तशीच फुलते..कविता जगी अशीच जन्मते..मी न कधी ती सांगू शकते..कविता मज ती कशी स्फुरते !